नोव्हेंबर महिना उजाडला तरी पाऊस काही परत फिरायचे नाव काढायला तयार नाही.धडधड एकामागोमाग एक अशी तीन तीन वादळे येणे आणि ती सुद्धा पाऊस आपले चंबू गबाळे आवरून भैरवीचे सूर आळवावे तसे ढगांचे नगारे आणि विजांच्या नाडमोडी, सळसळणा-या तारा छेडत निरोप घेत असताना ...हे अति म्हणण्याच्याही पलिकडचे आहे. या अचानक कधीही उद्भवणाऱ्या कमी दाबांच्या पट्टयांनी तर एवढी धडकी भरवून ठेवली आहे की, अर्धाअधिक महिना संपला तरी पाऊस गेला असे छातीठोकपणे सांगायची कोणाचीही छाती होणार नाही.अगदी हवामान खात्याने सप्रमाण सिद्ध करून दाखवले तरीही...नाही म्हणायला त्यांचे काही काही अंदाज ठरतात हो खरे ! रोजरोज खरी भविष्ये सांगायला ते काही बांधिल नाहीत कुणाचे.त्यांनी नेहमी 'अंदाज'च वर्तवलेले असतात आणि ते 'अंदाज' ते इमानेइतबारे 'अंदाजे' च सांगतात. परंतु या सगळ्या बेभरवशाच्या परिस्थितीमुळे काही नियमितपणे घडणाऱ्या घटनांचे चक्रसुद्धा बिघडले आहे. वर्षभर राबराब राबून पिकवलेल्या पिकाचे आणि शेतक-याच्या काळजाचेही शब्दशः पाणी-पाणी झालेच आहे. हे सगळेजण जाणतातच पण त्याचबरोबर दाणागोटयाने भरलेल्या घरातला समाधानी झालेल्या शेतकऱ्यांकडून आपलीही वर्षातील काही महिन्यांची तरी का होईना पण बेगमी करून घेण्यासाठी याच कालावधीत कोकणात उतरणारे विविध प्रकारचे मेंढपाळ, नंदीवाले, पोतराज म्हणजेच भवानी किंवा मरूआई घेऊन येणारे असे लोकही साशंकताच बाळगून आपली कोकणची वाट सावकाशपणे धरत आहेत असे जाणवते.
याच काळात सर्वात आधी येतात ते मेंढरांवाले... हो त्यांची ओळख इकडे 'मेंढरांवाले' अशीच आहे. साधारणतः सोलापूर, सांगली या जिल्ह्यातील हे मेंढपाळ नोव्हेंबरच्या सुरूवातीला आपल्या कुटुंबकबिल्यासह भटकंती करत, शेतांशेतांमध्ये आपली मेंढरं घेऊन जवळजवळ चार-पाच महिने फिरत असतात. वाटेत दिवस ढळू लागला की त्या कबिल्याचा म्होरक्या जवळपास असलेल्या गावात जातो . ब-याचवेळेस हा म्होरक्या आपली 'तहान' भागविण्यासाठी (पाण्याने नव्हे बरं का..) धंदयाच्या शोधात निघालेलला असतो. तसा तो याआधीही अनेक वर्षे या भागात येत असल्याने तो नेमके घर शोधून काढतोच आणि नसेलच माहित तर ते शोधून काढण्याचे कौशल्य कसे कोण जाणे हयांना साध्य झालेले असते कोणास ठाऊक पण शोधून काढतातच.कदाचित तळीरामाचा आत्मा त्यांना मदत करत असावा असे वाटते.यामध्येही एक दुसरे छुपे कामही त्याला करायचे असते . ते काम म्हणजे गावातील कुणी शेतकरी 'मेंढरं बसवायला' तयार आहे का याबद्दल आदमास घ्यायचा असतो. हे मेंढरं बसवणे म्हणजे रात्री एखाद्या शेतात मुक्काम करून सगळी मेंढरं त्या शेतात बसवून ठेवायची. यामुळे रात्रीच्या मुक्कामासाठी जागाही मिळायची आणि वर ज्याच्या शेतात रात्रीचा मुक्काम करतील त्या शेताचा मालक त्यांना चार-पाच पायल्या तांदूळ किंवा काही ठराविक पैसे ,कधीकधी दोन्ही देत असतो. असा दुहेरी फायदा या मेंढपाळांना मिळतो. त्याचप्रमाणे मेंढरांचे मलमूत्र उत्तम प्रकारचे नैसर्गिक खत असल्याने शेतक-यासाठीही हा सौदा फायदयाचाच ठरतो आणि त्यावर्षी त्याला कमी खत वापरून चांगले पीक येते. त्याबदल्यात दोनचार पायल्या तांदूळ देणे कधीही परवडणारे ठरते. या पैशांवर आणि तांदूळांवर मेंढपाळांचाही उदरनिर्वाह चालतो. त्यामुळेच की काय पण हे लोक रात्रीचा मुक्काम कोणी सांगितले नाही तर सहजासहजी कुणाच्या शेतात करत नाहीत. नाहीच कोण तयार झाले तर एखाद्या कातळ किंवा माळरानावर मुक्काम करून आपला 'बिझनेस माईंड' जपतात. अगदीच अशक्य असेल आणि शेतातच मुक्काम करण्यास पर्याय नसेल तर रात्री मुक्काम करून दुस-या दिवशी तो म्होरक्या शेताच्या मालकाला शोधून काढतो आणि त्याच्याकडून काहीतरी वसूल करतोच.तशी त्याला जास्त शोधाशोध करावी लागतच नाही कारण, शेताच्या मालकापर्यंत ही खबर गावखेडयातील अनधिकृत सूत्रांकडून पोहोचलेली असायचीच त्यामुळे तो सकाळीच शेताच्या बांधावर हजर होतो आणि आयताच सापडतो. थोडी खळखळ करतो पण देतो काहीतरी. तरीही हा मिळणारा मोबदला मेंढपाळांच्या संपूर्ण कुटुंबाला पुरेसा नसतोच.त्यातच हाच शिधा आणि पैसा पुढील वर्षभरासाठी साठवून ठेवायचा असतो.तो संपवून टाकला तर नंतर काय खाणार हा प्रश्न असायचाच. त्यामुळे मग संध्याकाळी काही वयस्कर महिला गावात फिरून भाकरतुकडा मागत फिरत, तर काही मुले गावात आपल्या बोलीतील गाणी म्हणत .कोणी एक-दोन रुपये देत त्याचा खाऊ खाऊन आनंद साजरा करत.खारेपाट भागात फिरताना गावापासून दूर असतील तर लहान मुले शेतातील पाण्याच्या खड्डयांमध्ये लहानलहान मासे पकडत. नंतर तेथेच गवत जमवून त्याची शेकोटी पेटवून त्यात ते मासे भाजून खात.त्यात कधीकधी एखादा आपल्या गलोलीने एखादे पाखरू मारून तेही भाजून खात, तीच त्यांची तंदुरी.एवढयानेही नाही भागले तर मग कधीकधी पोटाची आग शमवण्यासाठी नाईलाजाने पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या मेंढराला-कोकराला विकून त्यातून दिवस भागवावा लागतो.
या भटक्या जीवनामुळे खरे हाल होतात ते लहान मुलांचे. थंडी,ऊन,वारा या सगळ्यात ती करपून जातात. अर्धे वर्षे भटकंतीतच जात असल्यामुळे त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या मूलभूत गरजांचीच जिथे पूर्तता होऊ शकत नाही तिथे शिक्षणाची काय बात.... शिक्षणासाठीच्या शाळेच्या हजेरीपटावर नाव पण शाळेच्या वाटेपासून मैलोन् मैल दूर ही मुले आयुष्याच्या शाळेत जगण्याचे खडतर धडे गिरवत असतात. इथे शासनाच्या शेकडो योजनाही थिटया पडतात.कोणाला दोष देणार ??? ... शासनाला, पोटासाठी वणवण फिरणा-या त्याच्या पालकांना, त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आणि हजेरीपटावर आज काय शेरा मारू या विवंचनेत अडकलेल्या त्यांच्या शाळेच्या शिक्षकांना की स्वत:ची काहीच चूक नसताना परिस्थितीच्या चरकात पिळवटून निघणा-या त्या बालकांना. परिस्थिती योग्य नाही म्हणून शिक्षण नाही आणि शिक्षण नाही म्हणून परिस्थिती बदलत नाही .अशा विचित्र खोडयात अडकलेल्या मुक्या जनावरांसारखेच जिणे त्यांच्या नशीबी येते.
या गावाहून त्या गावी , त्या गावाहून पुढच्या गावी असे करत करत चार सहा महिन्यांनी घरी पोहोचायचे. जमवलेल्या बेगमीवर उन्हाळा,पावसाळा पार पाडायचा. त्यातच जत्रा,पालख्या, नवस सायास पार पाडायचे. मुलींची लग्ने कितीतरी लहान वयातच उरकून टाकली जातात . इथे कायदाही हतबल होतो. पुन्हा एका दुष्टचक्राला सुरुवात होते.लवकर लग्न, लवकर मुले, लवकर जबाबदारी आणि ती पार पाडण्यासाठी पुन्हा नशिबी भटकंतीच.डार्विंनचा उत्क्रांतीवाद काहीसा या समाजाने जणू गोठवून ठेवला आहे. शेती करून स्थित झालेला यांचा मूळ पुरूष जन्मालाच आला नसावा असे वाटते. मान्य आहे काहीजण शिकले नोकरीही करू लागले.त्यांचे जीवनमान उंचावले. पण अगदी बोटावर मोजण्याइतकेच असतील. शेवटी घटनात्मक आधार नसल्याने हा समाज आरक्षणाच्या आशेत आहे.पण त्यांच्या या आशेच्या आगीत त्यांचे तथाकथित उद्धारक आपल्याच पोळया भाजून घेत आहेत....बघूया किती दिवस ही भटकंती त्यांच्या नशिबी राहते ती. आशेचा किरण लवकर दिसू दे हीच अपेक्षा आणि प्रार्थनासुद्धा !!!
याच काळात सर्वात आधी येतात ते मेंढरांवाले... हो त्यांची ओळख इकडे 'मेंढरांवाले' अशीच आहे. साधारणतः सोलापूर, सांगली या जिल्ह्यातील हे मेंढपाळ नोव्हेंबरच्या सुरूवातीला आपल्या कुटुंबकबिल्यासह भटकंती करत, शेतांशेतांमध्ये आपली मेंढरं घेऊन जवळजवळ चार-पाच महिने फिरत असतात. वाटेत दिवस ढळू लागला की त्या कबिल्याचा म्होरक्या जवळपास असलेल्या गावात जातो . ब-याचवेळेस हा म्होरक्या आपली 'तहान' भागविण्यासाठी (पाण्याने नव्हे बरं का..) धंदयाच्या शोधात निघालेलला असतो. तसा तो याआधीही अनेक वर्षे या भागात येत असल्याने तो नेमके घर शोधून काढतोच आणि नसेलच माहित तर ते शोधून काढण्याचे कौशल्य कसे कोण जाणे हयांना साध्य झालेले असते कोणास ठाऊक पण शोधून काढतातच.कदाचित तळीरामाचा आत्मा त्यांना मदत करत असावा असे वाटते.यामध्येही एक दुसरे छुपे कामही त्याला करायचे असते . ते काम म्हणजे गावातील कुणी शेतकरी 'मेंढरं बसवायला' तयार आहे का याबद्दल आदमास घ्यायचा असतो. हे मेंढरं बसवणे म्हणजे रात्री एखाद्या शेतात मुक्काम करून सगळी मेंढरं त्या शेतात बसवून ठेवायची. यामुळे रात्रीच्या मुक्कामासाठी जागाही मिळायची आणि वर ज्याच्या शेतात रात्रीचा मुक्काम करतील त्या शेताचा मालक त्यांना चार-पाच पायल्या तांदूळ किंवा काही ठराविक पैसे ,कधीकधी दोन्ही देत असतो. असा दुहेरी फायदा या मेंढपाळांना मिळतो. त्याचप्रमाणे मेंढरांचे मलमूत्र उत्तम प्रकारचे नैसर्गिक खत असल्याने शेतक-यासाठीही हा सौदा फायदयाचाच ठरतो आणि त्यावर्षी त्याला कमी खत वापरून चांगले पीक येते. त्याबदल्यात दोनचार पायल्या तांदूळ देणे कधीही परवडणारे ठरते. या पैशांवर आणि तांदूळांवर मेंढपाळांचाही उदरनिर्वाह चालतो. त्यामुळेच की काय पण हे लोक रात्रीचा मुक्काम कोणी सांगितले नाही तर सहजासहजी कुणाच्या शेतात करत नाहीत. नाहीच कोण तयार झाले तर एखाद्या कातळ किंवा माळरानावर मुक्काम करून आपला 'बिझनेस माईंड' जपतात. अगदीच अशक्य असेल आणि शेतातच मुक्काम करण्यास पर्याय नसेल तर रात्री मुक्काम करून दुस-या दिवशी तो म्होरक्या शेताच्या मालकाला शोधून काढतो आणि त्याच्याकडून काहीतरी वसूल करतोच.तशी त्याला जास्त शोधाशोध करावी लागतच नाही कारण, शेताच्या मालकापर्यंत ही खबर गावखेडयातील अनधिकृत सूत्रांकडून पोहोचलेली असायचीच त्यामुळे तो सकाळीच शेताच्या बांधावर हजर होतो आणि आयताच सापडतो. थोडी खळखळ करतो पण देतो काहीतरी. तरीही हा मिळणारा मोबदला मेंढपाळांच्या संपूर्ण कुटुंबाला पुरेसा नसतोच.त्यातच हाच शिधा आणि पैसा पुढील वर्षभरासाठी साठवून ठेवायचा असतो.तो संपवून टाकला तर नंतर काय खाणार हा प्रश्न असायचाच. त्यामुळे मग संध्याकाळी काही वयस्कर महिला गावात फिरून भाकरतुकडा मागत फिरत, तर काही मुले गावात आपल्या बोलीतील गाणी म्हणत .कोणी एक-दोन रुपये देत त्याचा खाऊ खाऊन आनंद साजरा करत.खारेपाट भागात फिरताना गावापासून दूर असतील तर लहान मुले शेतातील पाण्याच्या खड्डयांमध्ये लहानलहान मासे पकडत. नंतर तेथेच गवत जमवून त्याची शेकोटी पेटवून त्यात ते मासे भाजून खात.त्यात कधीकधी एखादा आपल्या गलोलीने एखादे पाखरू मारून तेही भाजून खात, तीच त्यांची तंदुरी.एवढयानेही नाही भागले तर मग कधीकधी पोटाची आग शमवण्यासाठी नाईलाजाने पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या मेंढराला-कोकराला विकून त्यातून दिवस भागवावा लागतो.
या भटक्या जीवनामुळे खरे हाल होतात ते लहान मुलांचे. थंडी,ऊन,वारा या सगळ्यात ती करपून जातात. अर्धे वर्षे भटकंतीतच जात असल्यामुळे त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या मूलभूत गरजांचीच जिथे पूर्तता होऊ शकत नाही तिथे शिक्षणाची काय बात.... शिक्षणासाठीच्या शाळेच्या हजेरीपटावर नाव पण शाळेच्या वाटेपासून मैलोन् मैल दूर ही मुले आयुष्याच्या शाळेत जगण्याचे खडतर धडे गिरवत असतात. इथे शासनाच्या शेकडो योजनाही थिटया पडतात.कोणाला दोष देणार ??? ... शासनाला, पोटासाठी वणवण फिरणा-या त्याच्या पालकांना, त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आणि हजेरीपटावर आज काय शेरा मारू या विवंचनेत अडकलेल्या त्यांच्या शाळेच्या शिक्षकांना की स्वत:ची काहीच चूक नसताना परिस्थितीच्या चरकात पिळवटून निघणा-या त्या बालकांना. परिस्थिती योग्य नाही म्हणून शिक्षण नाही आणि शिक्षण नाही म्हणून परिस्थिती बदलत नाही .अशा विचित्र खोडयात अडकलेल्या मुक्या जनावरांसारखेच जिणे त्यांच्या नशीबी येते.
या गावाहून त्या गावी , त्या गावाहून पुढच्या गावी असे करत करत चार सहा महिन्यांनी घरी पोहोचायचे. जमवलेल्या बेगमीवर उन्हाळा,पावसाळा पार पाडायचा. त्यातच जत्रा,पालख्या, नवस सायास पार पाडायचे. मुलींची लग्ने कितीतरी लहान वयातच उरकून टाकली जातात . इथे कायदाही हतबल होतो. पुन्हा एका दुष्टचक्राला सुरुवात होते.लवकर लग्न, लवकर मुले, लवकर जबाबदारी आणि ती पार पाडण्यासाठी पुन्हा नशिबी भटकंतीच.डार्विंनचा उत्क्रांतीवाद काहीसा या समाजाने जणू गोठवून ठेवला आहे. शेती करून स्थित झालेला यांचा मूळ पुरूष जन्मालाच आला नसावा असे वाटते. मान्य आहे काहीजण शिकले नोकरीही करू लागले.त्यांचे जीवनमान उंचावले. पण अगदी बोटावर मोजण्याइतकेच असतील. शेवटी घटनात्मक आधार नसल्याने हा समाज आरक्षणाच्या आशेत आहे.पण त्यांच्या या आशेच्या आगीत त्यांचे तथाकथित उद्धारक आपल्याच पोळया भाजून घेत आहेत....बघूया किती दिवस ही भटकंती त्यांच्या नशिबी राहते ती. आशेचा किरण लवकर दिसू दे हीच अपेक्षा आणि प्रार्थनासुद्धा !!!
प्रविण गिरीधर म्हात्रे
पिरकोन, उरण, रायगड
मो. नं. 8097876540
email - pravin.g.mhatre@gmail.com
पिरकोन, उरण, रायगड
मो. नं. 8097876540
email - pravin.g.mhatre@gmail.com






